जेम्स डग्लस ह्या परदेशी व्यक्तीच्या नजरेतून रायगड पाहूया.



जेम्स डग्लस ह्या परदेशी व्यक्तीच्या नजरेतून रायगड पाहूया. 

Bombay and Western India ह्या त्याच्या पुस्तकात त्याने बऱ्याच नोंदी करून ठेवल्या आहेत. नोंदी म्हणजे अगदी तपशीलवार छोट्यातली छोटी गोष्ट सुद्दा त्याने नमूद केली आहे. काही गोष्टी त्याने विभागणी केली आहे त्यानुसार आपण पाहूया. 

पाचाड आणि तिथल्या पायऱ्या :-

पाचाडला एक रात्र आम्ही रामस्वामी मंदिरात राहिलो. एक घुबड मध्येच ओरडून गेलं. इथे एकेकाळी १०,००० घोडे बांधले जायचे. पाचाड हि गडावरची जुनी पेठ. इथे सगळीकडून माल यायचा, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी व्हायची. 

रायगडावरील बांधकाम :-

तो म्हणतो शिवाजी राजांच्या काळात त्यावेळी रायगडावर जवळपास ३०० दगडांची घर होती आणि एकूण मिळून दोन हजारच्या आसपास मनुष्यवस्ती गडावर होती. इथे अशा अनेक इमारती होत्या जसे कि प्रशासकीय इमारती जिथून प्रशासकीय काम चालायची, टाकसाळ, भली मोठी बाजारपेठ होती ज्याच्या खुणा (खांब) आपण आजही पाहू शकतो.  

रायगडावरून दिसणारं दृश्य :-

तोरणाच्या पाठून सूर्य उगवतोय. इथे पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण सगळीकडे डोंगरांशिवाय काहीच दिसत नाही. आमच्या पायाशी महाड आहे जिथे शिवाजीने त्याच्या तारुण्याचे बरेच दिवस घालवले. (इथे पुणे असा उल्लेख असायला हवा होता). इथे तो एक मजेशीर गोष्ट सांगतो ती अशी - शिवाजीचे कान खूप तीक्ष्ण होते आणि जे आपण पाहू शकतो त्याच्या कितीतरी पुढच त्याला कळायचं. एके रात्री तो (शिवाजीराजे) झोपले असताना अचानक जागे झाले आणि म्हणाले जंजिऱ्याच्या दंडाराजपुरीजवळ काहीतरी वाईट घडलं आहे. हे सत्य होत. तिथे दारूचा मोठा स्फोट झाला होता आणि तो प्रदेश शत्रूने (सिद्धी) घेतला होता. राजपुरी (दंडाराजपुरी) हे रायगड पासून २० मैल दूर आहे. 

शिवाजीराजांनी रायगड का निवडला :-

फोटो स्रोत - गुगल 
रायगड हा त्यांना जहागिरीत मिळालेला किल्ला नाही. तो त्यांनी लढून मिळवला साधारण १६६२ ते १६६४ च्या आसपास (१६५४ ते १६५६ च्या आसपास जावळी घेतली तेव्हा रायरी मिळाला). तो (जेम्स) असं म्हणतो कि शिवाजीराजांकडे खूप किल्ले होते खरं म्हणजे ते गेला तेव्हा त्यांच्यापाठी १५० किल्ले होते (पण खुद्द शिवाजीराजांच्या तोंडच वाक्य आहे - आज हजरतीस ३६० दुर्ग आहेत.) 

इंग्रजी दूतावास :- 

चार्ल्स दुसरा ह्याच्या काळात जेव्हा जनरल ऑन्गीर हा मुंबईचा गव्हर्नर होता तेव्हा त्याच्या देखरेखीखाली एक शिष्टमंडळ रायगडला शिवाजीच्या राज्याभिषेकासाठी पाठवण्यात आलं ज्यात हेन्री ऑक्झिण्डन आणि इतर दोन इंग्रजी अधिकारी होते. छोट्या बोटीतून मुंबई सोडल्यावर सहाव्या दिवशी ते पाचाड, चौल येथे आले.  

त्यांनी( हेन्री ऑक्झिण्डनने तिथे कसा वेळ घालवला :-

इथे तो म्हणतो कि हेन्री ऑक्झिन्डच्या मते शिवाजीला रामायण माहीत होत आणि त्यातल्या काही ओव्या तो सतत गुणगुणत असायचा. जर हे त्याला येत नसत तर हि एक लाजिरवाणी गोष्ट असती कारण रामायण लिहिणारा वाल्मिकी हा भारतीय कवीच होता. 




संदर्भ - 

१) Bombay  and Western India  - २


- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

Post a Comment

0 Comments